सुखाने जगायचंय?
तर मग हे करा-
1. "हे मलाच हवं
हेच मला हवं
हेच नको मला
हे मला नकोच"
यातील 'च' वजा करा.
तुमचे सुख वाढेल.
2. शक्य, सोपे, अवघड, अशक्य या चारही स्थिती स्वीकारल्या पाहीजेत.
3. "Nothing is impossible." म्हणत समुद्राला प्रवाही, आकाशाला फूल किंवा पर्वताला पंख लावता येत नसतात.
4. माणूस जिद्दी असावा पण हट्टी असू नये.
5. घार मगर चित्ता सरडा गरूड हे वेगवेगळे स्वभाव असणारे प्राणी आहेत. तसंच माणसांचही आहे. म्हणून तुलना करू नका.
6. स्वतःला बदला. बदला घेण्याचा नाद सोडून द्या.
7. पाठीचा कणा सुरक्षित राखा; स्वतःचा आणि इतरांचाही.
8. भगवंतावर भरवसा ठेवा.
9. आवश्यक असेल, तेव्हा बोला. आवश्यक असेल तेव्हा कृती करा.
आवडलं असेल हे सांगणं; तर म्हणा जय श्रीकृष्ण!
No comments:
Post a Comment