Friday, 26 August 2016

'सवय'

'सवय'

'सवय' हा शब्द मराठीत संस्कृतातील 'सव्य' या शब्दापासून तद्भव रूपात आला असावा. सव्य शब्दाचा सामान्य अर्थ नेहमीप्रमाणे as usual असा होतो.
         सवय हा शब्द मराठीत आल्यावर त्याचा थोडा उत्कर्ष झाला आहे. त्याचा संबंध काहीसा मनाशी जोडला गेलाय. अशी परिस्थिती जी वारंवार म्हणजे नेहमीप्रमाणे सहज घडून येते त्यातून मनाची काही एक अपेक्षा त्याबाबत तयार होते, ही प्रक्रिया 'सवय' या संज्ञेत तयार होते.
         सवय म्हणजे काय, हे समजल्यानंतर पुढचा प्रश्न; कोणतीही सवय वाईट असते का? याचे उत्तर असे की, 'सवय' हा मनःस्थिती आणि परिस्थितीचा एकत्रित परिणाम असतो.  Its result or outcome of  particular cause/s. तो चांगला किंवा वाईट हे त्या सवयीच्या स्वरूपावर अवलंबून असते.
         सवयीचे प्रमाण जेव्हा खूप वाढते; तेव्हा ते व्यसन होते. संस्कृतात तर संकट या अर्थी व्यसन शब्द उपयोजिला जातो. तेव्हा व्यसन मात्र वाईटच!
         त्यानंतरचा प्रश्न सवय दूर कशी करावी? तर आपण सवयीचे प्रमाण नियंत्रित करावे. आणि हे सहज शक्य आहे. फक्त एक लक्षणीय की, मन सकारात्मक आज्ञा लवकर ऐकते.

Tuesday, 23 August 2016

प्रो. डा. जतीन्द्रमोहन मिश्रा- प्रभावी व्यक्तित्व के धनी।

'' प्रो. डा. जतीन्द्रमोहन मिश्रा- प्रभावी व्यक्तित्व के धनी।''
- डा. चन्द्रहास शास्त्री सोनपेठकर
आदरणीय प्रो. डाॅ. जतीन्द्रमोहन मिश्रा सर से मेरा परिचय लगभग दस साल से है। ज्ञान की आभा तथा वाणी की मधुरता उनके व्यक्तित्व में समाहित है। यतियों के मुखियां भी मानों मिश्रा सर के वक्तृत्व पर मोहित होते हैं।
         मिश्रा सर आज एन सी ई आर टी संस्था मे सहयोगी प्राध्यापक हैं। हाल ही में उन्होंने संस्कृत राष्ट्रीय संगोष्ठी का सफल आयोजन किया । इस दौरान वह न तो थके हुंए दिखे न ही रुके हुंए । बस् व्यस्त अवश्य थे।
         इस संगोष्ठी में मै सहभागी होना चाहता हूं, यह सुनकर प्रसन्न हुंए । मेरा संशोधन संस्कृत अभिरुचि को लेकर है, यह सुनकर तो अतीव प्रसन्न हुंए । मुझे मार्गदर्शी सूचनाएँ भी दी। उनके साथ संवाद करते समय ऐसा लगता है, जैसे हमें अभी बहूत कुछ सिखना हैं।
         यह न केवल मेरा अपितु अनेक लोगों का अनुभव होगा। शांतचेतस् रहते हैं। यतीन्द्र जो ठहरें।
         कठिन परिश्रम करते है। कर्मठ है। सुहास्यवदन है। सदैव अपने मित्रों को कार्य करने हेतु प्रेरित करते है, मार्गदर्शन करते है। अनुशासनप्रिय है। तथा समायोजन कुशल भी है।
         संगोष्ठी के तीन दिन तथा उससे पूर्व एक माह तक उन्होंने जो परिश्रम की पराकाष्ठा की, वह तो अद्वितीय थी। हर एक प्रतिभागी उनके बारे मे बोलने के लिए लालायित था। सामनेवालेका मन जितकर कैसे कार्यक्रम सफल बनाए, यह कोई उनसे ही सिखे।
         समादरणीय प्रो. डा. मिश्रा सर का स्नेह ऐसे ही मिलता रहें, उनसे हम जिज्ञासा, विनम्रता एवं यशस्विता का पाठ पढ़ते रहें, सरजी और भी अनेकानेक उच्च स्थान विभूषित करें, इसी मंगलकामना के साथ;
          जय श्रीकृष्ण!!!

Monday, 15 August 2016

प्रेरणेचा झरा....!

प्रेरणेचा झरा....!
     - चन्द्रहास
           खरंच, काही व्यक्तिमत्त्वं ग्रेटच असतात. त्यांचं स्वप्न, त्यांचं ध्येय, बोलणं, वागणं त्या ध्येयासाठीची तपश्चर्या अद्वितीयच असते.
           मी तेव्हा पदवी शिक्षण घेत होतो. माझ्या एका मित्राने 'चाणक्य' चं मासिक आणलं. तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. मला ते मासिक पाहताक्षणी आवडलं. मग वाचलं. आणि अनेक कुतुहलं मनात तयार झाली. जिज्ञासेचा उदय झाला. आदरणीय अविनाश धर्माधिकारी सरांबद्दल एका प्राकृतिक आदराची रूपरेखा सिद्ध होण्याचा तो क्षण होता. लहानपणापासूनचा माझा एक रेकाॅर्ड आहे, मला ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कुतुहल वाटतं, जिज्ञासा असते; त्यांचा आणि माझा कुठेतरी संबंध येतो. कधी लवकर, कधी ऊशीरा.
           मासिक वाचलं. त्यानंतर लोकसभेचं इलेक्शन आलं. बातम्या आल्या. वाचल्या. कुतुहल आणखी वाढलं. नंतर काही वर्षांनी आदरणीय सरांची मुलाखत पाहिली. ऐकली. भारावून गेलो. बहुतेक ती मुलाखतही समीरण यांनीच घेतली असावी.
           त्यानंतर वर्ष 2011, मी टिळक शिक्षण महाविद्यालयात जाॅईन झालो. त्याच इमारतीत संध्याकाळी 'चाणक्य-'चे तास संपन्न होतात. म्हणजे आधी कुतुहल मग जिज्ञासा आणि नंतर संबंध हे रेकाॅर्ड मोडलं नाही, नियतीनं.
           2012 ऑक्टोबर, शिक्षक शिक्षणातील सर्वोत्कृष्टता या परिषदेत आदरणीय सरांचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकायला मिळाले. "शिक्षकाची सर्वोत्कृष्टता त्याच्या आई/माऊली होण्यात आहे." हे आदरणीय सरांचे वाक्य धमण्यांमध्ये भिनलंच जणु.
           नंतर 2013, गॅदरिंग महोत्सवातलं आदरणीय सरांचं भाषण, मला मिळालेली निवेदनाची संधी मी विसरू शकत नाही.
           याच दरम्यान हिंमत केली. फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. स्वीकारतील की नाही; ह्याबद्दल शंका होती. पण पाठवली. सरांनी रिक्वेस्ट स्वीकारली. खरं तर एवढ्यावर मी समाधानी होतो; आनंदी होतो.
           मी Sanskrit is my heart! या शीर्षकाचा ब्लाॅग सुरू केला. त्या ब्लाॅगपोस्ट्सला "आवड आणि प्रतिक्रिया" या रूपात आशीर्वाद मिळू लागले. संस्कृत छन्दोबद्ध रचना त्यात मुख्यत्त्वे असतात. आज एकूण रचना अनेक झाल्या. त्यात सरांचे आशीर्वाद लाभले की, आपण योग्य मार्गावर असल्याची जाणीव होते.
           कोणत्याही अॅक्टिव्हिटीला सरांचे आशीर्वाद लाभतात. सूर्याने काजव्याला शाबासकी दिली; तर काजव्याला किती आनंद होईल! अशीच ही अनुभूती आहे.
           काल जय महाराष्ट्रवर मुलाखत पाहिली, ऐकली. संस्कृतात मुलाखतीला ' साक्षात्कार ' असा शब्द आहे. किती छान शब्द! तर या मुलाखतीचा प्रारंभच समीरणने खूप सुंदर केला. सुंदर यासाठी की, माझ्याच भावना समीरण बोलत होते; असं वाटलं. सर अनेकानेक तरुणांचे कसे प्रेरणास्थान आहेत, ते कसं प्रोत्साहन देतात; कौतुक करतात या बद्दल मला जे वाटतं; तेच एका सिद्धहस्त पत्रकाराला वाटतं, याचा एक आनंद वाटला. एखाद्या गायकाची मेहफिल रंगत जावी, तशी कालची मुलाखत होती.
           या मुलाखतीतून काय उलगडलं, हे एका वाक्यात सांगायचं तर आदरणीय सरांचा अस्खलित ध्येयवाद आणि अखंड तपश्चर्या यांचा बोध झाला.
           संस्कृत सुभाषितकाराने वक्तृत्वाचे चार प्रकार सांगीतले आहेतः
           उद्बोधक
           प्रेरक
           रंजक
           ज्ञानद
           पुढे सुभाषितकार म्हणतो; एकाच वक्तृत्वात ह्या चारही प्रकारांचा योग असणे दुर्लभ आहे. सरांच्या वक्तृत्वात हे एकत्रिकरण साधलंय. चर्चेत असो, भाषणात असो किंवा अगदी लहानशा कमेंटमध्ये असो, ठामपणा असतो. नेमकेपणा असतो. कमीत कमी व सोप्या शब्दात आपल्याला स्टॅन्ड लक्षात येतो.
           इतिहास तोच असतो, जसं सृष्टी तीच असते. कोणी त्यात सौन्दर्यस्थळं शोधतो, कोणी राष्ट्र नि संस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान, कोणी आणखी काही. धर्माधिकारी सर त्यात राष्ट्र नि संस्कृतीचा जाज्ज्वल्य अभिमान आणि माणसाचा उत्कर्ष शोधतात नि मांडतात. मी सरांच्या व्यक्तित्त्वाकडे आकर्षित होण्याचं गमक यात असण्याची शक्यता प्रकर्षाने अधिक वाटते.
           माणूस प्रभावी कशामुळे ठरतो? शक्तिसंपन्नतेमुळे. सर्वात प्रभावी शक्ती कोणती? इच्छाशक्ती किंवा संकल्पशक्ती. जी उपनिषद् काळात नचिकेताकडे होती. स्वामी विवेकानंदांनाही जग बदलायला 100 नचिकेता हवे होते. सरांचीही इच्छाशक्ती संकल्पशक्ती प्रचंड असल्याचे जाणवते.
           अटलजींच्या कवितांमध्ये जो उज्ज्वल आशावाद प्रतिबिंबित होतो, तोच सरांच्या वक्तृत्वात, नेतृत्वात आणि कर्तृत्वात दिसून येतो. तसंही अटल आणि अविनाश हे दोन शब्द अर्थदृष्ट्या निकटतम आहेत.
           सरांनी अशाच प्रकारे भारतमातेची सेवा करत रहावी. आमच्या सारख्यांवर प्रोत्साहन, प्रेरणा आणि आशीर्वाद यांची वृष्टी करून या महान सृष्टीचं ऋण अंशतः तरी फेडण्याची आमची क्षमता विकसित करावी; हीच जगदंबचरणारविन्दी प्रार्थना।
           इति लेखनसीमा।

Sunday, 14 August 2016

सुखाचं गणित

सुखाचं गणित

गणित कितीही अवघड असो, सोपं असो किंवा लहान मोठं असो; ते फक्त 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या दहा अंकांभोवतीच भ्रमत असतं. माणसाचंही असंच असतं.
         बहुतेक प्रत्येक माणसाकडे एक अतिशय प्रभावी अशी क्षमता असते आणि एक तशीच समस्या. अन्य + & - बाबी या ती क्षमता आणि ती समस्या या भोवतीच असतात. साहजिकच समस्या कोणालाच नको असते. आणि क्षमता हवी असते. समस्या क्षीण व्हावी. तिचं निराकरण व्हावं आणि क्षमतेचा विकास व्हावा; असं प्रत्येकाला वाटत असतं.
            त्या वाटण्यात काही चूकही नाही. अगदी सिंह इत्यादि प्राणी पशु पक्षी सर्वांना असंच वाटत असावं. पण दर वर्षी पावसाळा येत असूनही कावळा घरटं बांधत नाही. तो त्रास स्वीकारतो पण आळस सोडत नाही. आळस हा त्याच्या स्वभावाचा म्हणा किंवा सवयीचा म्हणा भाग असतो. तीच त्याची खरी समस्या असते.
            असा सवयीचा भाग सहसा बदलत नाही. बरं माणूस स्वतः बदलत नाही आणि समोरच्या कडून बदलाची अपेक्षा करतो. या गोष्टीचं आश्चर्य करावं तितकं कमीच!
            माणसाला बहुतेक करून अधिक बुद्धीमान प्राणी मानले जाते. पण नेमकी क्षमता आणि नेमकी समस्या ओळखण्यात माणूसही कमी पडण्याची शक्यता असते. कधी अहंकार, कधी भूतकालाचं ओझं यामुळे नेमकेपणानं विचार करण्यात माणसाला अडचणी येतात.
            कोणत्याही माणसाला समस्या शक्य तितक्या लवकर निराकृत म्हणजे नाहीशी व्हावे, असे वाटते. सेल्फी, फेसबुक नि व्हाॅट्सॅपच्या या काळात virtual world चा scope वाढतोय. समस्या ही व्याधीसारखी असते. मूळापासून नाहीशी व्हायला वेळ लागणार. "एक बटन क्लिक करा; समस्या गायब" असं होत नसतं.
            न थांबता चालत राहणे; हा अनेक समस्यांवरील चांगला उपाय ठरू शकतो.
            कधी क्षमता तर कधी समस्या वरचढ ठरते. जेव्हा समस्या वरचढ ठरते, तेव्हा श्रद्धा, विचार हे औषध माणसाला जगवते. क्षमता वरचढ ठरते, तेव्हा अहंकार, क्रोध इनसे परहेज करें. यांपासून दूर राहता आलं, तर समस्या लवकर परत येऊ शकत नाही.
            अगदी अडचणीच्या कालातही अहंकार इ.मुळे समस्या संपत नाही; तर वाढते.
            अंकांची चलबिचल होते, तसं गणिताचं उत्तर बदलतं; सूत्र नाही. जीवनही भूमितीमधील त्रिकोण, चौकोनासारखे काटेकोर नसते. आकडे बदलतात म्हणून Mean बदलतो, पण प्राप्तांकांची बेरीज भागिले एकूण संख्या हे सूत्र बदलत नाही.
            भूतकालातील सुखाच्या प्रमाणाचं ओझं घेऊन माणूस विचलित तेवढा होऊ शकतो. भूतकालातील सुख अधिक असो वा दुःख अधिक असो; त्यामुळे वर्तमानातील समायोजनात ऋण फरक पडण्याचीच शक्यता अधिक असते.
           
            सगळं गणित मजेशीर, तटस्थपणे पाहील त्याला. सगळंच गणित अवघड काहीशा समजूतदार माणसाला. आणि सगळंच गणित सोपं ज्याला कळत नाही, त्याला.
            तेव्हा जीवनात आनंदी रहायचं असेल; तर ज्ञान वाढवा. समजूतदार असूनही आनंदी राहण्यासाठी श्रद्धा वाढवा आणि सुखी राहण्यासाठी अज्ञानाचा (काही बाबतीत) वर्ग करा.
            जय श्रीकृष्ण।।

Wednesday, 10 August 2016

Stand with 'self'

लढा, पण 'स्व'-च्या बाजूने....!!!
राजस्थानात वाळूच्या टेकडीवरही एखादं रोपटं वाढलेलं दिसतं. ते अबोल रोपटं परिस्थितीवर मात करू शकतं; तर माणूस का नाही?
नक्कीच! माणूसही परिस्थितीवर मात करू शकतो. फक्त त्याने स्वतःला जपलं पाहीजे. स्वतःच्या चारित्र्याला, निष्ठेला, कर्तव्याला जपलं पाहीजे.
स्व आणि परिस्थिती यात संघर्ष होऊ द्या. तुम्ही स्व च्या बाजूने लढा. परिस्थिती बदलणार!
प्रतिकूलतेची परिसीमा गाठल्यावर परिस्थितीची वाटचाल अनुकूलतेकडे होणारंय.
बाह्य पदार्थ माणसावर इतके परिणाम करतात की, तो आपली खरी शक्ती विसरून जातो, ही माणसाच्या दृष्टीने खरी समस्या आहे. माणूस आपल्या शक्तीचे खरे रूप जाणतो का?
का बरं माणूस स्वतःच्या दुःखाचा आणि दुस-याच्या सुखाचा इतका विचार करतो? एकदा हे चित्र ऊलट करा. दुस-याच्या दुःखाचा विचार करा. स्वतःच्या सुखाचा विचार करा.
जय श्रीकृष्ण।।

Wednesday, 3 August 2016

चला, माणूस होऊ या.

चला, माणूस होऊ या.
© डा. चन्द्रहास सोनपेठकर

"केवळ स्वतः नाही, आपल्या समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी." असं ज्याला वाटतं तो माणूस.

पण माणसाच्या या माझ्या व्याख्येत जगातील किती टक्के मनुष्याकृती प्राणी येतील, प्रश्नच आहे. खरं तर भगवंताची सर्वात सुंदर कलाकृती म्हणजे माणूस. पण
किती त-हा आहेत, या माणसाच्या?
काही तर कसे कुणाला दुखावता येईल, म्हणून टपलेले. त्यांचे विषयी विचार करणे म्हणजे चित्त मलीन करून घेणे.

काही दुखावत नाहीत, पण स्वार्थासाठी अंध झालेले.

साध्या राहण्यापेक्षा साध्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. साधं म्हणजे सरल पण कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही, असं बोलणं. हे साधं बोलता येणं सोपं नाही. त्यासाठी तुम्ही माणूसच असावं लागतं. मैथिलीशरण म्हणतात तसे; मानवच आहे की, तो आपल्या कृतीने देव आणि दानव काहीही होऊ शकतो.

दुस-याला आनंदी पाहता न येणं दानवाचं लक्षण.
समवेतची प्रत्येक व्यक्ती आनंदी असायला हवी; असं वाटणं मानवाचं लक्षण.
न्याय करणं हे देवाचं लक्षण.
क्षमा करून व्यक्तीच्या आनंदासाठी प्रयत्न करणं; हे संताचं लक्षण.

कधी कधी वाटतं वय मोजता येतं, वाढ मोजता येते. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून विकासाचा अंदाज घेता येतो. पण माणूसपणाचं काय? काही तरी एकक असायला हवं होतं. पण तरीही मननात् मानवः। म्हणजे मनन करणे, सखोल विचार करणे हेच खरं माणूसपणाचं व्यवच्छेदक लक्षण मानलं पाहीजे.

पैसा, स्थिरता किंवा समोर उपस्थित असलेल्या व्यक्तीपेक्षा एखादी भौतिक बाजू आपली भक्कम आहे, म्हणून अहंकार करणारी शेकडो माणसं दिसतात. तेव्हा वाटतं; किती मोठा टप्पा पार करायचायं माणूस होण्यासाठी.

दैवी समाजाचं स्वप्न पाहणा-या योगी अरविंदांची, समतेचा संदेश देणा-या संतांची, सुधारकांची, व्यक्ति स्वातंत्र्याचा पुरस्कार करणा-या स्मिथची माफी कशी मागावी, हेच समजत नाही.

चला, परस्परांना माणूस होण्यासाठी शुभेच्छा देऊ या.
जय श्रीकृष्ण!

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...