Wednesday, 10 August 2016

Stand with 'self'

लढा, पण 'स्व'-च्या बाजूने....!!!
राजस्थानात वाळूच्या टेकडीवरही एखादं रोपटं वाढलेलं दिसतं. ते अबोल रोपटं परिस्थितीवर मात करू शकतं; तर माणूस का नाही?
नक्कीच! माणूसही परिस्थितीवर मात करू शकतो. फक्त त्याने स्वतःला जपलं पाहीजे. स्वतःच्या चारित्र्याला, निष्ठेला, कर्तव्याला जपलं पाहीजे.
स्व आणि परिस्थिती यात संघर्ष होऊ द्या. तुम्ही स्व च्या बाजूने लढा. परिस्थिती बदलणार!
प्रतिकूलतेची परिसीमा गाठल्यावर परिस्थितीची वाटचाल अनुकूलतेकडे होणारंय.
बाह्य पदार्थ माणसावर इतके परिणाम करतात की, तो आपली खरी शक्ती विसरून जातो, ही माणसाच्या दृष्टीने खरी समस्या आहे. माणूस आपल्या शक्तीचे खरे रूप जाणतो का?
का बरं माणूस स्वतःच्या दुःखाचा आणि दुस-याच्या सुखाचा इतका विचार करतो? एकदा हे चित्र ऊलट करा. दुस-याच्या दुःखाचा विचार करा. स्वतःच्या सुखाचा विचार करा.
जय श्रीकृष्ण।।

No comments:

Post a Comment

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...