ज्याला जिंकायचंय, तो जिंकतोच!
- डॉ. चन्द्रहास सोनपेठकर
ज्याला जिंकायचंय, तो जिंकतोच! ज्याला जिंकायचं नाही, तो कारणे देतो. आणि ज्याला जिंकायचच आहे, तो एखादी लढाई हरली तरी युद्ध मात्र जिंकतोच!
ध्येय मोठे असणे ही चांगली बाब आहे. ध्येय व्यापक असणे हे उत्कृष्टतेचे पहिले लक्षण आहे. स्वतःच स्वतःच्या यशासाठी प्रयत्न करणे या पेक्षा अधिकाधिक माणसांनी परस्परांच्या यशासाठी प्रयत्न केले, तर आनंद वाढतो. श्रम कमी जाणवतात.
Team work experience is really joyful always.
आपण माणूस आहोत. आपल्याला नेहमी उत्कृष्टतेचा ध्यास असावा. खरी स्पर्धा आपली आपल्याशी आहे. कालच्या पेक्षा मी आज अधिक उत्तम असावे.
जिंकण्याचा एक प्रयत्न असतो. तो एक प्रवास असतो. शुभाः सन्तु पन्थानः।
Nice one
ReplyDeleteThanks!
Delete