Sunday, 4 September 2016

"परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग."

"परस्परावलंबित्व, माणूस आणि आनंदाचा मार्ग."

         *मानवच काय, अगदी पशु पक्षी वनस्पती सर्वांचेच जीवन हे तसे काॅम्प्लेक्स असते. आणि याचे एक प्रमुख कारण परस्परावलंबित्व असण्याची शक्यता आहे.
         *गरजा कितीही कमी असो किंवा अधिक; त्यांची पूर्तता करण्यासाठी अन्य कोणावर तरी अवलंबून रहावे लागते.
         *उत्क्रान्तीच्या हजारो वर्षांच्या कालात सर्व जीवजंतूंना जगण्यासाठीचे परस्परावलंबित्व अंगवळणी पडले आहे. जगण्यासाठी श्वास घेणे आवश्यक आहे. आपण नित्य श्वास घेतो, न विसरता आणि म्हणूनच न आठवता देखील.
         *खरं तर या परस्परावलंबित्वाला काही लोक परावलंबित्व समजतात. पण वास्तव नाकारणं चूक होय. ऊलट आपण सर्वांना अधिकाधिक सहकार्य केले तर परस्परावलंबित्वात सहजता येते.
         *परावलंबित्वाचे वर्णन परस्परावलंबित्व असे केले पाहीजे. तुम्हाला न मागता मदत मिळेल असा प्रयत्न करा. ही सृष्टी तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत देणारंय. जिथून आज सहकार्य मिळाले नाही, तेथूनही उद्या लाभू शकते.
         *विज्ञान तंत्रज्ञानाने चहाचे यंत्र तयार केले. पण यंत्र बिघडल्यावर काय? नीट करण्यासाठी कोणाला तरी बोलवावे लागते. तेव्हा एकंदरच निसर्ग आणि मानव तसेच व्यक्ती व समाज यांच्यात एक परस्परावलंबित्व असते. ते अनिवार्य म्हणजे ज्याचे निवारण होऊ शकत नाही, असे असते.
         *सारांश, परस्परावलंबित्व नैसर्गिक आहे. त्याचा आदर करा. 'मै' ची जागा 'हम' ला द्या. स्वतःत किंवा अन्य कोणातही चूक पाहण्यापेक्षा बरोबर काय ते आपल्याला आधी दिसलं पाहीजे. बरोबर असणारा भाग वाढवत नेला की, चूकीचा भाग आपोआप कमी होतो.
         *खरं तर परस्परावलंबित्वामुळे माणूस दुःखी नाही. लोकांनी माझ्या अनुकूल तेच केले पाहीजे या हट्टामुळे माणूस दुःखी आहे. प्रत्येक जागी अनुकूल मार्ग मिळतो म्हणून नदी सागरापर्यंत पोचत नाही. पर्वत, द-या खोरे यांविषयी सद्भावना, ध्येयवाद, संयम आणि चिकाटी यांच्या सहाय्याने नदीला फायनल डेस्टिनेशनपर्यंत पोचता येते.
         *नगर निगमने पाणी सोडलं तर मला पाणी मिळेल, हे समजून घेता. पाऊस पडला तर पाणी मिळेल हे समजून घेता. भगवंताने कृपा केली, तर मला पाणी मिळेल, हे देखील समजून घ्यायला हवे ना? भगवंतावर आपला विश्वास असला पाहीजे ना? आपण भगवंतावर अवलंबून आहोत; हे समजून घ्यायला हवे ना?
         *माणसासाठी किती छान आहे की, तो नामस्मरण करू शकतो. सर्व विचार बाजूला ठेवा. एकाग्र व्हा. नामस्मरण करा. नामस्मरणाचा कल्पवृक्ष उपलब्ध आहे, या पेक्षा काय हवे? नामस्मरण हाच आनंदाचा यशाचा सोपा मार्ग आहे, असे मला तरी वाटते.

No comments:

Post a Comment

गुजरात विधानसभा निवडणुक चर्चा तर होणारच

गुजरात विधानसभा निवडणूकः चर्चा तर होणारच!              डॉ. चन्द्रहास सोनपेठकर गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या आहेत. मीड...