व्यक्तीच्या यशस्वीतेत तत्त्वज्ञानाची भूमिका
प्रत्येक ठिकाणी फर्स्ट राहण्यापेक्षा चांगलं राहण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट राहण्यासाठी स्पर्धा असेल, क्यु असेल, ईर्ष्या असेल. चांगलं राहण्यासाठी असं स्पर्धा इत्यादि काहीच नसेल. पण एक लक्षात ठेवा, तुमचा चांगुलपणा तुम्हाला अटल अद्वितीय असं स्थान देईल. ध्रुवबाळाला ओळखतंच असाल तुम्ही!
बरं तुम्ही कितीही वेळेस स्पर्धा करून पहिलं स्थान मिळवलं तरीही कधी ना कधी ते रेकाॅर्ड मोडलं जाऊ शकतं.
याचा अर्थ असा नाही की, यशासाठी प्रयत्न करू नयेत. यशासाठी नेहमी नेहमी प्रयत्न केलाच पाहीजे. पण तो कोणा दुस-याच्या नव्हे तर आपल्या स्वतःच्या पुढे जाण्यासाठी.
"मी कालपेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या अधिक प्रज्ञावान प्रतिभावान यशस्वी असायला हवं" ही महत्वाकांक्षा माणसाला उच्चतम आणि उत्तमोत्तम यशशिखरापर्यंत घेऊन जाते.
पण हे सारं करण्यासाठी व्यक्तीचा तात्विक पाया भक्कम असला पाहीजे. कोणतं तरी एक तत्त्वज्ञान त्याच्या जीवनाचं अविभाज्य असं अंग असलं पाहीजे. मला स्वतःला या संदर्भात योग आणि वेदांत ही दोन दर्शने महत्वाची वाटतात. योग माणसाच्या मनावर बाहेरील गोष्टींचे परिणाम थांबविण्यास शिकवितो. वेदांत मर्मदृष्टी देतो. अन्य दर्शनांची मतांची उपयुक्तता मी नाकारीत नाहीये. माझ्या अल्पशा अनुभवानुसार या दोन तत्त्वज्ञानांबद्दल मी लिहीतोय.
स्वस्थ शरीर स्वस्थ मन योगाकडून करून घ्यावे. नि मग असे स्वस्थ मन भक्तिमय व्हावे. बुद्धीस वेदांत सिद्धान्तांचा वेध घेण्याच्या कार्यी लावावे. यातून एक तात्त्विक बैठक विकसित होते. या तात्त्विक बैठकीची यशस्वितेत एक यथार्थ भूमिका असते.
(अपूर्ण)
JSK!!!
बरं तुम्ही कितीही वेळेस स्पर्धा करून पहिलं स्थान मिळवलं तरीही कधी ना कधी ते रेकाॅर्ड मोडलं जाऊ शकतं.
याचा अर्थ असा नाही की, यशासाठी प्रयत्न करू नयेत. यशासाठी नेहमी नेहमी प्रयत्न केलाच पाहीजे. पण तो कोणा दुस-याच्या नव्हे तर आपल्या स्वतःच्या पुढे जाण्यासाठी.
"मी कालपेक्षा आज आणि आजच्या पेक्षा उद्या अधिक प्रज्ञावान प्रतिभावान यशस्वी असायला हवं" ही महत्वाकांक्षा माणसाला उच्चतम आणि उत्तमोत्तम यशशिखरापर्यंत घेऊन जाते.
पण हे सारं करण्यासाठी व्यक्तीचा तात्विक पाया भक्कम असला पाहीजे. कोणतं तरी एक तत्त्वज्ञान त्याच्या जीवनाचं अविभाज्य असं अंग असलं पाहीजे. मला स्वतःला या संदर्भात योग आणि वेदांत ही दोन दर्शने महत्वाची वाटतात. योग माणसाच्या मनावर बाहेरील गोष्टींचे परिणाम थांबविण्यास शिकवितो. वेदांत मर्मदृष्टी देतो. अन्य दर्शनांची मतांची उपयुक्तता मी नाकारीत नाहीये. माझ्या अल्पशा अनुभवानुसार या दोन तत्त्वज्ञानांबद्दल मी लिहीतोय.
स्वस्थ शरीर स्वस्थ मन योगाकडून करून घ्यावे. नि मग असे स्वस्थ मन भक्तिमय व्हावे. बुद्धीस वेदांत सिद्धान्तांचा वेध घेण्याच्या कार्यी लावावे. यातून एक तात्त्विक बैठक विकसित होते. या तात्त्विक बैठकीची यशस्वितेत एक यथार्थ भूमिका असते.
(अपूर्ण)
JSK!!!
No comments:
Post a Comment